आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे. बलवंतराय मेहता समितीने ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केली आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने १ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली. १ जुलै १९९८ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेची स्थापना झाली. आज रोजी ६ पंचायत समिती आणि ४९१ ग्रामपंचायती ग्रामीण भागांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. ७३ व्या घटना दुरूस्तीद्वारे महिलांना सत्तेत सहभाग दिलेला असून ग्रामसभाद्वारे ग्रामपंचायतींना जादा अधिकार देणेत आलेले आहे. शासनाची कोणतीही नवीन योजना, अभियांन, मोहिम राबविण्यात वाशिम जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.
वाशीमचे प्राचीन नाव वत्सगुल्म / वात्सुलग्राम आहे.यास बच्छोम, बासम असेही म्हणतात. इ.स.पूर्व सुमारे ३०० पासून येथे सातवाहन या राजवंशाची सत्ता होती.प्राचिन विदर्भात प्रशासकीय सोईसाठी दोन ठिकाणी राजधान्या करण्यात आल्या. एक म्हणजे वाशीम व दुसरे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील 'नंदिवर्धन' (सध्याचे नगरधन. वाशीम येथे वाकाटकांची राजधानी होती. वाकाटकांचे साहित्यातील योगदान महत्त्वावाचे आहे. त्यांच्या काळात 'वत्सगुल्म'च्या परिसरात अनेक तीर्थक्षेत्रे होती. आजही,वाशीमचा बालाजी प्रसिद्ध आहे. येथे पद्मतीर्थ नावाचे तीर्थस्थानही आहे. त्यानंतर चालुक्यांचे राज्य आले. त्यांनी आपली राजधानी दुसऱ्या ठिकाणी नेली. त्यामुळे या शहराचे महत्त्व कमी झाले. त्यानंतर आलेल्या यादवांच्या राजवटीत पुन्हा या स्थानाचे महत्त्व वाढू लागले.त्यानंतर इंग्रजांचे राज्यात वऱ्हाड हा मुलूख आल्यावर त्यांनी वाशीमला जिल्ह्याचे ठिकाण केले. परंतु, महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या १९०५ मध्ये झालेल्या पुनर्रचनेत हा भाग नजीकच्या अकोला जिल्ह्यास जोडण्यात आला. त्यानंतर जानेवारी २६ जुलै १९९८ मध्ये पुन्हा वाशीम हा जिल्हा घोषित करण्यात आला.
विदर्भाचा इतिहास प्राचीन आहे.विदर्भावर वाकाटक, चालुक्य, यादव, मोगल, निजाम, ईंग्रज यांनी वर्षानुवर्षे राज्य केले आहे. वर्हाड प्रांताचा एक भाग म्हणजे वाशिम जिल्हा. वाशिम हे गाव ऐतिहासिक व प्राचीन म्हणून प्रसिद्ध आहे. वाकाटक राजाजी राजधानी आणि वत्सऋषीची तपोभूमी “वत्सगुल्म” नागरी म्हणजेच आजचे वाशिम शहर होय.प्राचीन काळापासून साहित्य, संस्कृतीचे माहेरघर आणि राजकीय व सामाजिक सांस्कृतिक चळवळीचे केंद्र म्हणून सुपरिचित आहे. ईंग्रज राजवटीत इ.स.१९०५ सालापर्यंत वाशिम हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण होते. नऊ दशकानंतर अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन २६ जुलै १९९८ रोजी वाशिम जिल्हा निर्माण झाला.
वाशिम विदर्भाच्या पूर्वेकडील भागात स्थित आहे. त्याच्या उत्तरेला अकोला, उत्तर-पूर्व मध्ये अमरावती आहे, हिंगोली दक्षिणेस आहे, बुलढाणा पश्चिमेला आहे, यवतमाळ हा पूर्वेस आहे. पैनगंगा नदी ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. हे रिसोड च्या तहसील माध्यमातून वाहते. पुढे वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते. पैनगंगाची मुख्य उपनदी कास ही नदी आहे. कास नदीचा परिसर शेळगाव राजगुरे या गावापासून सुमारे 1 किमी अंतरावर आहे. अरुणावती नदी आणि त्याच्या उपनद्यांतील वाशिम तालुक्यात उगम होऊन ते यवतमाळ जिल्ह्यात मंगरुळपीर व मानोरा तालुक्यामधून वाहते. काटेपुना नदीचा उगम जिल्ह्याच्या डोंगराळ भागात होतो आणि मालेगावच्या तहसीलद्वारे उत्तरेकडे वाहून अकोला जिल्ह्यात प्रवेश करतो.